Amravati Lok Sabha : "मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये", नवनीत राणांचे विधान

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

भाजपच्या उमेदवार नवनीत राणांचे मोदी लाटेबद्दल विधान.
भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि नरेंद्र मोदी.
social share
google news

Navneet Rana On PM Modi : काही दिवसांपूर्वी भाजप आलेल्या आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातून पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या नवनीत राणा यांच्या विधानाची मतदारसंघात आणि राज्यात चर्चा रंगली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आणि 2019 मध्ये अमरावतीमध्ये काय राजकीय स्थिती होती, हेच जाणून घ्या. (Navneet Rana stated that do not depend on Modi wave)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजप आणि महायुतील मित्रपक्षांचा विरोध झुगारून भाजपने राणा यांनी उमेदवारी दिली. त्यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. पण, त्यांनी केलेल्या एका विधानाने भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

नवनीत राणा नक्की काय बोलल्या?

नवनीत राणा यांच्या भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या म्हणताहेत की, "ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायती सारखी लढायची आहे. 12 वाजेपर्यंत सर्व मतदार आपल्याला बुथवर न्यायचे आहेत. सर्वांनी मतदान केलं पाहिजे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महायुती की मविआ, कुणाचा होणार 'गेम'? धक्कादायक पोल

पुढे त्या म्हणतात की, "मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये. एवढी मोठी यंत्रणा असून 2019 मध्ये एक अपक्ष उमेदवार निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडून गेली होती", असं विधान नवनीत राणा यांनी केले आहे.

बावनकुळेंबद्दलही केलं होतं विधान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानाला नवनीत राणांनी उत्तर दिले होते. तेही चर्चेचा विषय ठरला होता. झालं असं होतं की, नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बावनकुळे असे म्हणालेले की, नवनीत राणा या पती रवि राणा यांना भाजपमध्ये घेऊन येतील.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> सोन्याचे भाव अचानक इतके का वाढले? नेमकं काय घडलं?

त्याला उत्तर देताना नवनीत राणा म्हणालेल्या की, "बाहेरच्या व्यक्तींनी नवरा-बायकोमध्ये न बोललेलं बरं." या विधानाची चर्चा थांबत नाही, तोच आता नवनीत राणांनी मोदींबद्दल विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

नवनीत राणांचा खुलासा

या विधानाबद्दल नवनीत राणांनी खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, "ज्या पद्धतीने काही गोष्टी एडिट करून विरोधक बातमी उलटी दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्या सर्व विरोधकांना माझं सांगणं आहे की, या देशातील आम्ही सगळे उमेदवार मोदीजींच्या नावाने जनतेपर्यंत जात आहोत. मोदींची विकास कामे आम्ही सांगत आहोत. मोदींच्या समोर कुणीही विरोधी व्यक्ती नाहीये. मोदीजींची हवा होती, आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे."

"देशाच्या प्रगतीसाठी मोदीजी आवश्यक आहेत. आणि अब की बार चारशे पार... 2024 मध्ये मोदीजी पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार आहे. त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याबद्दल एडिट करून काही प्रयत्न करत आहेत. मला त्यांना एकच सांगणं आहे की, बावनकुळे हे आमचे नेते आहेत आणि मी जे बोलले होते, ते आमचे अचलपूरचे आमदार (बच्चू कडून) आहेत त्यांच्यासाठी हे शब्द वापरले होते. विरोधकांनी हे करण्यापेक्षा लोकांच्या हिताकरीता बोलले पाहिजे", असे त्या म्हणाल्या आहेत. 

2019 मध्ये काय लागला होता निकाल?

1999 पासून शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघातून नवनीत राणांनी 2019 मध्ये गुलाल उधळला होता. नवनीत राणा या अपक्ष उमेदवार होत्या. पण, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने पाठिंबा दिला होता. नवनीत राणांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

हेही वाचा >> 'मविआ' किती जागा जिंकणार? ठाकरेंनी केली मोठी भविष्यवाणी 

नवनीत राणा यांना 5 लाख 10 हजार 947 मते मिळाली होती. तर आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 73 हजार 996 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपरे यांना 65 हजार 135 मते मिळाली होती.

भाजपसह महायुतीतील पक्षांचा विरोध

नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास भाजपमधूनच विरोध झाला. त्याचबरोबर शिवसेनेकडे ही जागा होती. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांनीही विरोध केला. महत्त्वाचं म्हणजे महायुतीचा भाग असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे राणांच्या विरोधात आहेत. त्यांनी दिनेश बूब यांना उमेदवारी दिली आहे. तर आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT