Lok Sabha 2024 : 'या' तीन तालुक्यातील राजकारण अजित पवारांचं गणित बिघडवणार?

राहुल गायकवाड

शिवतारे राज्यमंत्री असताना पुरंदरवरुन बारामतीला देण्यात येणाऱ्या पाण्यावरुन वाद पेटला होता. अजित पवार आणि संग्राम थोपटे यांच्यातील संघर्ष अद्याप सुरु आहे.

ADVERTISEMENT

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अजित पवारांचे चिंता वाढवणार, असे दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्या नेत्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे

point

अजित पवारांना कोणत्या नेत्याचे आव्हान?

Baramati Lok Sabha 2024 Ajit Pawar : राज्यात सगळ्यात जास्त लक्ष कुठल्या मतदारसंघावर असेल तर ते म्हणजे बारामती. पहिल्यांदाच सुळे विरुद्ध पवार असा सामना बारामतीमध्ये होणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्याचं स्पष्ट झाल्याने कोण निवडूण येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, दुसरीकडे मुलीसाठी शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. बारामतीमध्ये पवारांनी बैठका आणि मेळाव्यांचा धडाका लावला आहे. अजित पवार देखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी मतदारसंघात मोर्चेबांधणी करत आहेत. अजित पवार जरी जोरदार तयारी करत असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असे तीन तालुके आहेत जे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतात. नेमके हे तालुके कुठले आणि या तीन तालुक्यांचं राजकारण अजित पवारांचं लोकसभेचं गणित कसं बिघडवू शकतं हेच समजून घ्या...

अजित पवार आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी जीवाचं रान करत असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, भोर आणि पुरंदर या तीन तालुक्यांचं गणित अजित पवारांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. हे समजून घेण्यासाठी सुरुवात करुयात इंदापूर तालुक्यापासून.... 

इंदापूर कसा महत्त्वाचा...

इंदापूर हा पूर्वीचे काँग्रेसचे आणि सध्याचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा गड मानला जायचा. या गडाला सुरुंग अजित पवारांनी लावण्यास सुरुवात केली. २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही तरी चालेल पण राष्ट्रवादी आपला उमेदवार उतरवणार असं म्हणत अजित पवारांनी दत्ता भरणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.

१९९५ ते २०१४ हर्षवर्धन पाटील यांची या भागात निर्विवाद सत्ता होती. २०१४ ला अजित पवारांनी दत्ता भरणे यांना निवडूण आणलं. पुढे २०१९ ला देखील अजित पवारांनी दत्ता भरणे यांना उमेदवारी देऊन निवडूण आणलं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांमध्ये वितुष्ट निर्माण झालं. हे वितुष्ट अजूनही सुरु आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp