मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत ब्लॅक आऊट! वीज पुरवठा ५५ मिनिटांसाठी खंडीत

दिव्येश सिंह

महापारेषण कंपनीच्या पडघा येथील ४४० किलोवॅट उच्चदाब वीज वाहिनीत मंगळवारी सकाळी १० च्या दरम्यान अचानक बिघाड झाला. त्यामुळे बदलापूर, कल्याण, डोंबिवली, डोंबिवली एमआयडीसी, पलावा सिटी, मुंबई, ठाणे या सगळ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. महाराष्ट्रात मंगळवारी सकाळी मुंबई आणि ठाण्यातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला. सूत्रांनी सांगितले की, कळवा पडघा 400 केव्ही ट्रान्समिशन लाइन ट्रिप […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महापारेषण कंपनीच्या पडघा येथील ४४० किलोवॅट उच्चदाब वीज वाहिनीत मंगळवारी सकाळी १० च्या दरम्यान अचानक बिघाड झाला. त्यामुळे बदलापूर, कल्याण, डोंबिवली, डोंबिवली एमआयडीसी, पलावा सिटी, मुंबई, ठाणे या सगळ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला.

महाराष्ट्रात मंगळवारी सकाळी मुंबई आणि ठाण्यातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला. सूत्रांनी सांगितले की, कळवा पडघा 400 केव्ही ट्रान्समिशन लाइन ट्रिप झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला.

मुंबईतील दादर, माहीम, वांद्रे, खार, वाकोला, सांताक्रूझ आदी भागात वीजपुरवठा खंडित झाला. डोंबिवली आणि कल्याणसारख्या ठाणे भागात सकाळी १० वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला. आधीच उकाडा आणि तापमान प्रचंड वाढलेलं आहे. अशात वीज गेल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडाच्या दुरूस्तीचं काम महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हाती घेतलं. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती देण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp