MumbaiTak Baithak 2024: "...तर प्रकाश आंबेडकर आणि वंचितचे 4 जण खासदार झाले असते"
Varsha Gaikwad Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेबद्दल वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले. त्यांनी एक खंतही यावेळी व्यक्त केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वर्षा गायकवाड यांचे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर भाष्य

मविआ वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार?

प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिल्याने गायकवाड नाराज?
Varsha Gaikwad on Vanchit Bahujan Aghadi : मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीला घेतलेल्या एका निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर महाविकास आघाडीसोबत न आल्याने वंचित बहुजन आघाडीचे कसे नुकसान झाले, याबद्दल त्यांनी भाष्य केले. (Varsha Gaikwad Offers to vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar for alliance)
प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव काढली आहे. महाराष्ट्रात तिसरी आघाडी होऊ शकते, तसा प्रयत्न सुरू आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या व्होट बँकेत वाटेकरी निर्माण होईल. मविआ याबद्दल गांभीर्याने विचार करावा लागेल, असे वाटतेय का?, असा प्रश्न वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आला.
हेही वाचा >> मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं? वर्षा गायकवाडांनी मांडली काँग्रेसची भूमिका
प्रश्नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड यांनी उत्तर देताना सांगितले की, "प्रकाश आंबेडकरांबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात वेगळी भावना आहे. पण, एक गोष्ट मी इथे स्पष्ट करू इच्छिते की, २०१९ मध्ये त्यांना मतदान झाले. पण, यावेळी समाजाने विचार केला की, लोकशाही आणि संविधान वाचवायचे."
लोकांनी भाजपविरोधात मतदान केले -गायकवाड
"संविधान, लोकशाहीविरोधात असलेल्या भाजपला हटवायचं. संविधानविरोधातील विधानामुळे लोकांनी भाजपविरोधात मतदान केले. प्रकाश आंबेडकर ज्या ज्या वेळी मला भेटले, त्यावेळी मी त्यांच्यासमोर भूमिका मांडली की, आपली लढाई संविधानासाठी लढायची आहे", असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.