आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारची लाज काढताच मुनगंटीवारांचा पारा चढला…
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही सत्ताधारी-विरोधकांमध्ये सभागृहात जोरदार खडाजंगी बघायला मिळाला. राज्यात कुपोषणामुळे एकही बालक मृत्यूमुखी पडलेले नाही. इतर आजारांनी बालकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत यांनी विधानसभेत दिले. त्यानंतर विरोधकांनी मंत्री गावित यांना घेरले. कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या उत्तराने आम्ही समाधानी नसल्याचे सांगत आमदार जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे यांनी […]
ADVERTISEMENT

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही सत्ताधारी-विरोधकांमध्ये सभागृहात जोरदार खडाजंगी बघायला मिळाला. राज्यात कुपोषणामुळे एकही बालक मृत्यूमुखी पडलेले नाही. इतर आजारांनी बालकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत यांनी विधानसभेत दिले. त्यानंतर विरोधकांनी मंत्री गावित यांना घेरले. कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या उत्तराने आम्ही समाधानी नसल्याचे सांगत आमदार जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
पावसाळी अधिवेशनात काल (बुधवारी) सभागृहाच्या बाहेर जोरदार राडा पाहायला मिळाला होता. सत्ताधारी-विरोधक आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने मोठा निर्माण झाला होता. त्यानंतर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कुपोषणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले.
गावित यांच्या उत्तरावर आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री महोदय कुपोषणाबाबत चुकीची माहिती देत असल्याचे सांगितले. तसेच आदिवासी समाजासाठी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये राजकारणी म्हणून काही करु शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे असे वक्तव्यही त्यांनी केले.
ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) चांगलेच आक्रमक झाले. लाज वाटली हा शब्द असंसदीय आहे. तो वापरला नाही पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवर म्हणाले. अडीच वर्ष आपण सत्तेत होता. मग आपल्या वडिलांना लाज वाटली का असे म्हणत आहात का? असा प्रतिसवाल मुनगंटीवार केला. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला.