शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली..

मुंबई तक

खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा केली.

ADVERTISEMENT

Fadnavis on Loan Waiver
Fadnavis on Loan Waiver
google news

बातम्या हायलाइट

point

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार?

point

मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली..

Fadnavis on Loan Waiver : खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा केली. 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बोलताना ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.

खरीपावर अल निनोचं संकट

या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, खरीप हंगामावर अल निनोचं मोठं संकट आहे. हवामान विभागातर्फे 88 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांमध्ये त्याची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाच्या अंदाजानुसार प्लॅनिंग आहे. जलयुक्त शिवारची कामे वेगाने करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांना अटक, फेसबुकवरुन दिली माहिती, कारण काय?

चार निर्णय कोणते?

बियाणांविषयी बोलताना ते म्हणाले की, साथी पोर्टलवर रजिस्टर असलेलं बियाणंच घ्यावं. सध्या उपलब्ध खत 25 लाख मेट्रिक टन आहे. यावेळी त्यांनी चार महत्त्वाच्या निर्णयांविषयी सांगितले.

१. महाविस्तार 2.0 अॅप : 40 लाख लोक वापरतात. हे अॅप शेतकऱ्यांचा कृषीमित्र आहे. यामध्ये एआयचा वापर करुन शेतकऱ्यांना विविध माहिती पुरवली जाणार आहे. पाऊस किती  पडणार याचाही अंदाज कळणार आहे.

हे वाचलं का?