'देवेंद्र फडणवीसांनीच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहावं..', महसूल मंत्री बावनकुळेंच्या 'या' वक्तव्याचा नेमका काय अर्थ

मुंबई तक

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनीच 20234 पर्यंत मुख्यमंत्री राहावं, विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे. मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये. असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या ट्विटचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.

ADVERTISEMENT

devendra fadnavis should remain chief minister until 2034 chandrashekhar bawankules categorical statement political speculation intensifies following sanjay rauts claim
चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान
Google CTA

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना UBT पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात अनेकदा दावे केले आहेत. त्यातच खासदार संजय राऊत यांनीही शनिवारी (11 जुलै) याच मुद्द्यावर भाष्य करत फडणवीसांनंतर मुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव पुढे येऊ शकतं, असा दावा केला.

मात्र, या सर्व चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी या सर्व चर्चा 'अफवा' आणि 'बिनबुडाचे आकलन' असल्याचं म्हटलं असून, देवेंद्र फडणवीस यांनीच 2034 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावं, अशी भावना व्यक्त केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलं?

"सध्या अफवांचा बाजार गरम आहे. यातीलच अफवा आज पेरली गेली. त्याला बिनबुडाचे आकलन म्हणावे लागेल. सूर्यप्रकाशाइतके एक सत्य आहे. महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन मा. श्री. देवेंद्र फडणवीसजीच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहावेत, ही महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची भावना आहे. विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे. मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये."

या पोस्टमधून बावनकुळे यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा>> मोदींचे 'Blue Eyed Boy' असलेल्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून दिल्लीत नेणं इतकं सोपं आहे का?

संजय राऊतांनी काय दावा केला होता?

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याची चर्चा सुरू असल्याचा दावा केला. तसेच, फडणवीसांनंतर मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव पुढे येऊ शकतं, असं त्यांनी म्हटलं.

हे वाचलं का?