आदित्य ठाकरे विधानसभेत चवताळून उठले.. पण तिथं आधी आणि नंतर घडलं तरी काय?, सगळंच प्रचंड इंटरेस्टिंग!
Aditya Thackeray vs Atul Bhatkhalkar: महाराष्ट्र विधानसभेत चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी आदित्य ठाकरे प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळाले.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी (9 जुलै) महाराष्ट्र विधानसभेत अल्पकालीन चर्चेदरम्यान मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना UBT पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारकडे मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याच्या घटना आणि नैसर्गिक आपत्तीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. ज्याचे पुढेत वादात रुपांतर झाले. यावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यातील तीव्र शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली.
सभागृहात 'तुम्ही बसा खाली', 'राम मंदिर लुटणारे', 'चंदा चोरांनी बोलू नये' अशा आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. अखेर तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी हस्तक्षेप करत सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
भास्कर जाधवांनी उपस्थित केला संवेदनशील मुद्दा
अल्पकालीन चर्चेदरम्यान भास्कर जाधव यांनी राज्यातील मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याच्या घटना, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर सरकारला धारेवर धरले. या विषयावर उत्तर महसूल मंत्री किंवा मदत व पुनर्वसन विभागाच्या कॅबिनेट मंत्र्यांनीच द्यावे, अशी त्यांनी मागणी केली होती. मात्र त्यावेळी संबंधित कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते.
हे ही वाचा>> "मुख्यमंत्री आहेस ना तू..", फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावरुन राज ठाकरे संतापले
राज्यमंत्र्यांच्या उत्तरालाही भास्कर जाधवांचा आक्षेप
पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांनी सरकारच्या वतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र भास्कर जाधव यांनी यावर आक्षेप घेत हा विषय राज्यासाठी अत्यंत संवेदनशील असल्याने कॅबिनेट मंत्र्यांनीच उत्तर देणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.










