दोन लोकांची कॅबिनेट म्हणजे…; अजित पवारांचं एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावर बोट
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिना उलटून गेला, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आमदारांना मोठ्या प्रमाणात मंत्री करतो म्हणून सांगितलं आहे की, काय हेही कळायला मार्ग नाही, असं म्हणत अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीसांच्या सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद झाली. […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिना उलटून गेला, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आमदारांना मोठ्या प्रमाणात मंत्री करतो म्हणून सांगितलं आहे की, काय हेही कळायला मार्ग नाही, असं म्हणत अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीसांच्या सरकारवर निशाणा साधला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवारांनी राज्यातील विविध प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अजित पवारांनी सत्कार समारंभावरून टोला लगावला.
अजित पवार काय म्हणाले?
“मधल्या काळात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. मराठवाडा-विदर्भात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यंत्रणेनं जशा पद्धतीनं हालचाल करणं अपेक्षित होतं, तसं होताना दिसत नाही. सुरुवातीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केला. पण त्यांनी केंद्राच्या पथकांना सांगायला हवं होतं. पण ते झालेलं नाही.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“अनेक गावांत पाणी शिरलं होतं. नद्यांचं पाणी गावात शिरलं. शेतांमध्ये शिरलं. पिकांची नासाडी झाली. खरीपाचा हंगाम निघून घेलेला आहे. कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे. तशा सूचना अजून खालपर्यंत गेलेल्या नाहीत. या सगळ्या बाबी घटताना तातडीची मदत मिळायला हवी होती.” असंही अजित पवार म्हणाले आहेत.