राज्यपालांना विमान प्रवास नाकारला, ठाकरे सरकारवर चिडले भाजप नेते
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमान नाकारण्यात आल्याने ठाकरे सरकारविरोधात भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विमान प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानागी नाकारली. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरून पुन्हा राजभवनावर येण्याची वेळ ओढवली. या सगळ्या प्रकारानंतर भाजप नेते ठाकरे सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. Maharashtra Guv Bhagat Singh Koshyari was scheduled to go […]
ADVERTISEMENT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमान नाकारण्यात आल्याने ठाकरे सरकारविरोधात भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विमान प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानागी नाकारली. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरून पुन्हा राजभवनावर येण्याची वेळ ओढवली. या सगळ्या प्रकारानंतर भाजप नेते ठाकरे सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Maharashtra Guv Bhagat Singh Koshyari was scheduled to go to Dehradun today by a state govt plane However when Governor reached Mumbai Airport, he was told that permission to fly him in that plane has not been given. He has now booked a commercial flight to Dehradun.
— ANI (@ANI) February 11, 2021
काय म्हणाले प्रविण दरेकर?
ठाकरे सरकारने सूड भावनेचा अतिरेक केला असं म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राजकारणातले मतभेद मी नक्कीच समजू शकतो. मात्र राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. सूड भावना त्यांच्यामध्ये किती भरली आहे हे स्पष्ट होतं आहे. कोणत्याही गोष्टी घडल्या की केंद्राकडे बोट दाखवायचं आणि स्वतःचं अपयश झाकायचं हे प्रकार ठाकरे सरकार करतं आहे असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?