Lumpy skin disease virus : लम्पी व्हायरसचा गायीच्या दुधावरही परिणाम होतोय का?; कशी घ्याल खबरदारी?

मुंबई तक

महाराष्ट्रात जनावरांमध्ये लम्पी व्हायरसचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचा थेट परिणाम दूध आणि त्याच्या उत्पादनावर होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील उस्मानाबाद, अहमदनगर, परभणी, जळगाव, अकोला, बीड, कोल्हापूर, धुळे, सातारा, औरंगाबाद, लातूर, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये लंपी विषाणूचा शिरकाव झाल्याची माहिती आत्तापर्यन्त समोर आली आहे. लम्पी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय? या आजारात जनावरांच्या डोळयातून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात जनावरांमध्ये लम्पी व्हायरसचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचा थेट परिणाम दूध आणि त्याच्या उत्पादनावर होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील उस्मानाबाद, अहमदनगर, परभणी, जळगाव, अकोला, बीड, कोल्हापूर, धुळे, सातारा, औरंगाबाद, लातूर, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये लंपी विषाणूचा शिरकाव झाल्याची माहिती आत्तापर्यन्त समोर आली आहे.

लम्पी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय?

या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते. लंपीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो. जनावरे चारा खाणे, पाणी पिण्याचा प्रमाण कमी होतो.हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते. पायावर तसेच कानामागे सूज येते.जनावरे दूध देण्यास कमी पडतात.

शेतकऱ्यांना बसतोय लम्पी व्हायरसचा फटका

देशातील अनेक राज्यात लम्पी स्किन या विषाणूचा फैलाव झाला आहे. त्यामुळे हजारो जनावरांना याची लग्न झाली आहे. संक्रमण झालेल्या जनावरांचं दूध देण्याचं प्रमाण कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटातून जावं लागत आहे. कारण शेतीसह शेतकऱ्यांचा दुधाचा जोड व्यवसाय असतो. त्यामुळे दूध कमी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. म्हणून यावर शासनाने तात्काळ उपाययोजना आणाव्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

दूध जास्त काळ उकळावे

गाईच्या दुधात असलेले विषाणू देखील दूर केले जाऊ शकतात. यासाठी दूध जास्त वेळ उकळणे आवश्यक आहे. अन्यथा पाश्चरायझेशनद्वारे वापरले जाणारे दूध कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही, कारण ते विषाणू पूर्णपणे नष्ट करते. यामध्ये मानवासाठी कोणतेही हानिकारक घटक शिल्लक नाहीत. परंतु हे दूध जर गाईच्या वासरांनी पिले तर ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत वासरांना वेगळं करावं.

हे वाचलं का?

    follow whatsapp