अपयशी देशाकडून धडे शिकण्याची गरज नाही ! मराठमोळ्या अधिकाऱ्याने UNHRC मध्ये पाकला ठणकावलं
काश्मिर प्रश्नावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारताने खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. दहशतवादाचं केंद्र असलेल्या आणि अपयशी देशाकडून आम्हाला धडे शिकण्याची गरज नाही असं उत्तर भारताचे जेनेव्हामधले मराठमोळे अधिकारी पवन बढे यांनी दिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी अधिकार आयोगात बोलत असताना पाकिस्तानने काश्मिरमधल्या सध्याच्या परिस्थितीचा दाखला देत भारतावर टीका केली होती. पाकिस्तानची […]
ADVERTISEMENT

काश्मिर प्रश्नावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारताने खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. दहशतवादाचं केंद्र असलेल्या आणि अपयशी देशाकडून आम्हाला धडे शिकण्याची गरज नाही असं उत्तर भारताचे जेनेव्हामधले मराठमोळे अधिकारी पवन बढे यांनी दिलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवी अधिकार आयोगात बोलत असताना पाकिस्तानने काश्मिरमधल्या सध्याच्या परिस्थितीचा दाखला देत भारतावर टीका केली होती.
पाकिस्तानची जगभरात ओळख ही दहशतवादाला खतपाणी घालणारा, प्रशिक्षण देणारा देश अशी आहे, अशा देशाकडून आम्हाला धडे शिकण्याची गरज नाही असं भारताने म्हटलं आहे. काश्मिर प्रश्नावर UNHRC ने आयोजित केलेल्या Organization of Islamic Cooperation (OIC) मध्ये बोलत असताना पाकिस्तानने केलेल्या टीकेला उत्तर देताना पवन बढे यांनी भारताची बाजू परखडपणे मांडली.
पाकिस्तानने स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी स्वतःकडे असलेल्या अध्यक्षपदाचा वापर करत OIC ला ओलीस ठेवण्याचा प्रकार केला असल्याचंही बढे म्हणाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर खोट्या माहितीच्या द्वारे नेहमी भारताविरुद्ध बोलत रहायचं ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याचंही बढे यावेळी म्हणाले. स्वतःच्या देशात मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत बढे यांनी पाकिस्तानला टोला लगावला.