वक्फ बोर्डाच्या पुणे आणि औरंगाबाद येथील कार्यालयांवर ईडीचे छापे, नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार?

मुंबई तक

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण सात ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त समोर आलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे हा तपास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण सात ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त समोर आलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

वक्फ बोर्ड हे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येतं. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढणार का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

ईडीची ही कारवाई नवाब मलिक यांच्यापर्यंत पोहचणार का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. नवाब मलिक यांनी गेल्या महिन्याभरापासून केंद्रीय यंत्रणांचा वापर हा महाराष्ट्रातलं सरकार बदनाम करण्यासाठी कसा केला जातो आहे हे सांगितलं होतं. भाजपवरही त्यांनी आरोप केले होते. आत्ता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आहेत की नाही हे सांगता येणार नाही. पण ईडीने जमिनीच्या सौद्यांवरून जे छापे मारले आहेत त्यावरून नवाब मलिकांनी अडचणीत येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp