नागपुरातील उड्डाणपूल दुर्घटनेला कोण जबाबदार?; वरिष्ठ अधिकारी म्हणतात…
-योगेश पांडे नागपूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन असलेल्या उड्डाण पुलाचा मोठा भाग शनिवारी कोसळला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली, तरी घटनेला जबाबदार कोण आणि कारवाई होणार का? याबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. यासंदर्भात ‘मुंबई तक’ने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कारवाईबद्दल प्राधिकरणाची भूमिका स्पष्ट केली. […]
ADVERTISEMENT

-योगेश पांडे
नागपूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन असलेल्या उड्डाण पुलाचा मोठा भाग शनिवारी कोसळला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली, तरी घटनेला जबाबदार कोण आणि कारवाई होणार का? याबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. यासंदर्भात ‘मुंबई तक’ने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कारवाईबद्दल प्राधिकरणाची भूमिका स्पष्ट केली.
मंगळवारी रात्री नागपुरातील पारडी परिसरातील निर्माणाधीन उड्डाणपुलाचा मोठा भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या मोठ्या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, पूल कोसळल्याच्या कारणांची चर्चा शहरभर सुरू असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित केली आहे.
लवकरच समितीचा अहवाल आल्यानंतर दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी दिली.