आर्यन खानवर कारवाई ते क्लिनचीट, नवाब मलिकांची अटक; समीर वानखेडेंची बदली काय घडलं ८ महिन्यात?

मुंबई तक

२ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षीचा २ ऑक्टोबर हा दिवस एका वेगळ्याच कारणाने गाजला. कॉर्डिलिया या क्रूझवर एनसीबीने कारवाई केली आणि आर्यन खानसह आठ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली. पुढचा महिनाभर हे प्रकरण गाजत होतं. तर ही कारवाई करणारे त्यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर असलेले समीर वानखेडे यांची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

२ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षीचा २ ऑक्टोबर हा दिवस एका वेगळ्याच कारणाने गाजला. कॉर्डिलिया या क्रूझवर एनसीबीने कारवाई केली आणि आर्यन खानसह आठ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली. पुढचा महिनाभर हे प्रकरण गाजत होतं. तर ही कारवाई करणारे त्यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर असलेले समीर वानखेडे यांची आता चेन्नईत बदली झाली आहे. मागच्या आठ महिन्यात काय काय घडलं आपण जाणून घेऊ या बातमीतून-

समीर वानखेडे यांची आता महसूल गुप्तचर संचलनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून नॉन सेसिंटिव्ह पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबरला अटक झाली होती त्यानंतर तो सुमारे २० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरूंगात होता. त्याला २७ ऑक्टोबरला जामीन मिळाला आणि तो ३० ऑक्टोबरला तुरुंगाबाहेर आला.

आर्यन खानवर समीर वानखेडे यांनी कारवाई केल्यामुळे ते चर्चेत आले खरे. मात्र आर्यन खानच्या अटकेनंतर आरोप आणि प्रत्यारोपांची खरी लढाई रंगली ती नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात. २ ऑक्टोबरची कारवाई झाल्यानंतर चार दिवसातच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही एनसीबीने केलेली कारवाई म्हणजे फर्जिवाडा असल्याचं म्हटलं होतं. त्या एका पत्रकार परिषदेनंतर जवळपास रोज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा ट्विट करून समीर वानखेडेंवर विविध आरोप केले.

आर्यन खानला क्लिन चिट, समीर वानखेडे, सना मलिक काय म्हणाले?

हे वाचलं का?

    follow whatsapp