दहशतवाद्यांच्या मुंबई कनेक्शनबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका सहा दहशतवाद्यांना काल अटक केली आहे. यापैकी एकजण मुंबईतला आहे. यावरून भाजपने महाराष्ट्र एटीएस झोपलं होतं का अशी टीका केली आहे. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे.

कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याआधी ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यापेक्षा किंवा बाकिच्या काही गोष्टी करण्यापेक्षा सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अजिबात त्यांना दुसऱ्या कोणत्या गोष्टींसाठी अडकून ठेवलेलं नाही.

आपणही इतर राज्यात जाऊन तशी कारवाई करतो. जर माहिती परिपक्व असेल आणि स्थानिक ठिकाणाहून कुणाला अटक करायची असेल. तर स्थानिक पोलिसांना अवगत केलं जातं. पण माहिती गोळा करत असताना थेट अटक करण्याचे अधिकार देखील पोलिसांना आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केलेली आहे. आपल्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. तसंच यातले फारसे बारकावेही मला आपल्याला सांगता येणार नाहीत कारण त्याचा परीणाम तपासावर होऊ शकतो असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

पाकिस्तानच्या एका मोठ्या दहशतवादी मोड्युलचा दिल्ली पोलीस आणि युपी एटीएसने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव समीर असं आहे तो ड्रायव्हर म्हणून मुंबईत काम करतो ही माहिती आता समोर आली आहे. पाकिस्तानच्या ISI या अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनेने या सगळ्यांना फंडिंग केलं होतं.

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. त्यामध्ये समीर कालिया 12 सप्टेंबरपासून गायब होता आणि 14 तारखेला त्याला अटक झाली तेव्हाच ही बाब समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार समीर कालिया मुंबईहून दिल्लीला जात असताना कोटा या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

याच मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. मात्र कुणीही या सगळ्या गोष्टींचं राजकारण करू नये असा सल्ला दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला दिला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT