Maharashtra Bandh : आज ‘महाराष्ट्र बंद’! काय सुरु आणि काय असणार बंद?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षाने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ताधारी आघाडी असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने (MVA)शेतकऱ्यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला आहे. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये पूर्ण शक्तीने सहभागी होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले होते की, ‘केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात लोकांना जागृत करणे आवश्यक आहे. शेतकरी या लढ्यात एकटे नाहीत आणि त्यांच्यासोबत एकता दाखवण्याची प्रक्रिया महाराष्ट्रापासून सुरू झाली पाहिजे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान नेमकं काय सुरु असणार

  • हॉस्पिटल

ADVERTISEMENT

  • रेल्वे

  • ADVERTISEMENT

  • बस

  • लोकल ट्रेन

  • किराणा

  • भाजीपाला

  • दूध विक्री

  • या जीवनावश्यक गोष्टी या ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनादरम्यान देखील सुरु राहणार आहेत. त्यामुळे सामन्यांना फारशा अडचणी येणार नाही.

    पाहा महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान नेमक्या कोणत्या गोष्टी बंद राहणार

    महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या गोष्टी बंद राहणार आहेत. यावेळी बंदचा निषेध करण्यासाठी पाहा महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान नेमकं काय सुरु असणार

    पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद राहणार आहे. बाजार समिती ही अत्यावश्यक सेवेत असली तरी शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत हा बंद पाळण्यात येणार आहे.

    Maharashtra Bandh: ‘बंद’मध्ये आम्हाला खेचू नका म्हणणारे व्यापारी देखील होणार बंदमध्ये सहभागी!

    व्यापारी संघटनांनी सोमवारी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड व्यापारी संघटनेने सोमवारी सर्व फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार बंद राहतील असे जाहीर केले आहे.

    व्यापारी संघटनेनेही सर्व सदस्यांना सोमवारी आपला व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे कृषी उत्पादन सोमवारी बाजारात आणू नये असे आवाहन केले आहे.

    लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिलेली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT