महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री करणार इंदोरीकर महाराजांचं ‘प्रबोधन’, लस घ्यावी यासाठी सांगणार चार युक्तीच्या गोष्टी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बारामती: प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. असं असताना आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्या वक्तव्याबाबत लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले आहे.

इंदुरीकर यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात मी स्वतः कोरोनाची लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही. असे वक्तव्य केले होते. ‘निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना मी स्वतः वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन.’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

‘त्यांच्या स्टाईलमध्ये केलेल्या प्रबोधनातून समाजामध्ये जागृती होते त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजाशी जास्त संपर्क आलेला नाही. जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणल आहे. महाराजांचा अध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र, वैज्ञानिक बाजू देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे.’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘प्रबोधनकार-किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हे माझ्या अत्यंत परिचयाचे आहेत. ते ज्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात. समाजाला किर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात, तो त्यांच्या स्टाईलमुळे लोकांना भावतो. त्यामुळे नागरिक त्यांच्या किर्तनाला मोठी गर्दी करतात.’

काही होतच नाही, तर…; कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं कोरोना लसीबद्दल वादग्रस्त विधान

ADVERTISEMENT

‘त्यांनी लसीसंबंधी असे वक्तव्य केले असेल तर मी त्यांच्याशी नक्की बोलने. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे किर्तनावर बंधने होती. आता किर्तने सुरु झाली आहेत. महाराजांचे व माझे प्रेमाचे, विश्वासाचे संबंध आहेत. महाराजांनी स्वतःला जरुर प्रोटेक्ट केलेले असेल किंवा मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशी काळजी ते घेत असतील. परंतु प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.’ असे आव्हानही टोपे यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

पाहा काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज?

‘कोरोना झालेल्या त्यांच्या कुटुंबियांनी सर्वाधिक त्रास दिला. कोरोना रुग्ण खुर्चीवर बसत असेल, तर बसू द्यायचं नाही. त्याच्या गोधड्या पेटवून दिल्या. 75 टक्के लोकं कोरोना मेली नाही, तर टेन्शनमुळे गेली आणि घरच्यांनी घालवली. त्याच्या ताटात जेवायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगळी असते, हे तरी कळायला पाहिजे ना. ज्ञान आणि प्रतिकारक शक्ती प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते.’

‘डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्यांनीही रुग्णांच्या हातात गोळ्या दिल्या नाहीत. फेकल्या. फक्त पैसे गोळा केले. त्याला गोळी फोडून देण्याची आणि गोळी घेतल्यानंतर दुपारपर्यंत बरं वाटेल असं सांगण्याची गरज होती. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता आणि प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगळी असते.’

‘आम्ही दिवसभर फिरतो. काय होईल? मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही, तर घेऊन करायचं काय? कोरोनाला एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. त्याच्या गादीवर झोपायचं नाही, हा काय बावळटपणा आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला, तर सीता घेऊन गेला. इथे राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेनं डोकावून पण पाहिलं नाही’, असं इंदोरीकर महाराज कीर्तन करताना म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT