काही होतच नाही, तर…; कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं कोरोना लसीबद्दल वादग्रस्त विधान
कोरोनाच्या संसर्गाला पायबंद घालून संभावित तिसरी लाट टाळण्यासाठी सरकारकडून नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून नागरिकांना लसीकरणाचं महत्त्व पटवून देत लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. असं असताना प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या संसर्गाला पायबंद घालून संभावित तिसरी लाट टाळण्यासाठी सरकारकडून नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून नागरिकांना लसीकरणाचं महत्त्व पटवून देत लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. असं असताना प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी कोरोना लसीबद्दल विधान केलं. लोकनेते स्वर्गीय गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१ व्या जयंती निमित्ताने घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी शेतकरी मेळावा आणि इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी हे विधान केलं.
काय म्हणाले इंदोरीकर महाराज?
“कोरोना झालेल्या त्यांच्या कुटुंबियांनी सर्वाधिक त्रास दिला. कोरोना रुग्ण खुर्चीवर बसत असेल, तर बसू द्यायचं नाही. त्याच्या गोधड्या पेटवून दिल्या. 75 टक्के लोकं कोरोना मेली नाही, तर टेन्शनमुळे गेली आणि घरच्यांनी घालवली. त्याच्या ताटात जेवायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगळी असते, हे तरी कळायला पाहिजे ना. ज्ञान आणि प्रतिकारक शक्ती प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते.”