राणा चालीसा वाचतात की नाही याच्याशी सर्वसामान्यांना घेणंदेणं नाही; सुजय विखेंचा वेगळा सूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री इथे हनुमान चालीसा पठनाच्या वादातून अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हायकोर्टाने झापलं आहे. एकीकडे भाजप या मुद्द्यावरुन शिवसेनेला धारेवर धरत असताना अहमदनगरचे भाजप खासदार यांनी राणा दाम्पत्याला टोलला लगावला आहे. राणा दाम्पत्य चालीसा वाचतात की नाही याच्याशी सर्वसामान्यांना काहीच घेणंदेणं नाही, राजकीय नेत्यांनी […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री इथे हनुमान चालीसा पठनाच्या वादातून अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हायकोर्टाने झापलं आहे. एकीकडे भाजप या मुद्द्यावरुन शिवसेनेला धारेवर धरत असताना अहमदनगरचे भाजप खासदार यांनी राणा दाम्पत्याला टोलला लगावला आहे.
राणा दाम्पत्य चालीसा वाचतात की नाही याच्याशी सर्वसामान्यांना काहीच घेणंदेणं नाही, राजकीय नेत्यांनी सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणं गरजेचं असल्याचं सुजय विखे-पाटील म्हणाले आहेत. ते औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
“आज टीव्हीवर आपल्याला जे पहायला मिळतंय ते बोगसपणा आहे. शेतकऱ्यांच्या वीजेबाबत कोणीही बोलायला तयार नाही. ग्रामीण भागात अजुनही कुठे वीज टिकून राहत नाहीये. दुधाच्या भावाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला हे पहावं लागत आहे. माझी सर्वांनाच विनंती आहे की निर्बंध पाळून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणं गरजेचं आहे. जे काही सुरु आहे त्याच्याशी सर्वसामान्यांना काहीही घेणंदेणं नाही. राणा चालीसा वाचतायत की नाही याच्याशी शेतकऱ्यांना काही घेणंदेणं नाही, त्यांना वीज मिळाली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे.”
राणांना वॉशरूमलाही जायला दिलं नाही, फडणवीसांचे पोलिसांवर गंभीर आरोप