Pitru Paksha 2021 : श्राद्धाचं महत्त्व काय असतं आणि प्रमुख तिथी कोणत्या?

मुंबई तक

पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यात येणारा पंधरा दिवसांचा कालावधी असतो. या कालावधीत पितरांना घास ठेवण्याची, श्राद्ध करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. हिंदू धर्मात पितृ पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचं, मृत नातलगांचं श्रद्धेने केलेलं स्मरण याचा अर्थ होतो श्राद्ध. श्राद्धविधी केले जातात ते याच कालावधीत. पितरांना मुक्ती मिळावी म्हणून श्राद्ध कर्म केलं जातं. धार्मिक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यात येणारा पंधरा दिवसांचा कालावधी असतो. या कालावधीत पितरांना घास ठेवण्याची, श्राद्ध करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. हिंदू धर्मात पितृ पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचं, मृत नातलगांचं श्रद्धेने केलेलं स्मरण याचा अर्थ होतो श्राद्ध. श्राद्धविधी केले जातात ते याच कालावधीत. पितरांना मुक्ती मिळावी म्हणून श्राद्ध कर्म केलं जातं.

धार्मिक मान्यता अशीही आहे की जर तुमचे पितर नाराज असतील तर तुमची प्रगती होत नाही. अनेक अडथळे त्या प्रगतीत निर्माण होतात. त्यामुळेच पितृ पक्षामध्ये पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना मोक्ष मिळावा या हेतूने पिंड दान केलं जातं. श्राद्ध घातलं जातं. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सर्वपित्री अमावस्येपर्यंतचा काळ म्हणजे पितृ पक्ष. या वर्षी हा काळ 20 सप्टेंबर 6 ऑक्टोबर असा आहे. मात्र 20 तारखेला षौष्ठोपदी पौर्णिमा आली असल्याने त्या दिवशी श्राद्ध केलं गेलं नाही. ही तिथी ज्या पितरांची असेल त्यांचं श्राद्ध पंचमी किंवा षष्टमीला घातलं जावं असं या वर्षी पंचागात नमूद कऱण्यात आलं आहे.

पितृपक्षाचं महत्त्व काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp