सत्यजित तांबेंचा खळबळजनक गौप्यस्फोट! नाना पटोलेंचं प्रदेशाध्यपद धोक्यात?
satyajeet Tambe shocking revelation about Nashik garaduate election 2023 : नाशिक पदवीधरवरून रंगलेल्या काँग्रेसतंर्गत राजकारणाबद्दल आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज खळबळजनक गौप्यस्फोट केला. चुकीचे एबी फॉर्म (AB Form), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी हे पक्षातील नेत्यांकडून षडयंत्र होतं आणि मला उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न झाले, असं म्हणत सत्यजित तांबे […]
ADVERTISEMENT

satyajeet Tambe shocking revelation about Nashik garaduate election 2023 : नाशिक पदवीधरवरून रंगलेल्या काँग्रेसतंर्गत राजकारणाबद्दल आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज खळबळजनक गौप्यस्फोट केला. चुकीचे एबी फॉर्म (AB Form), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी हे पक्षातील नेत्यांकडून षडयंत्र होतं आणि मला उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न झाले, असं म्हणत सत्यजित तांबे यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीकडे प्रदेश कार्यकारिणीवर कारवाई करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांचं प्रदेशाध्यक्षपदच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालीये. (Satyajeet Tambe serious allegations on nana patole)
एबी फॉर्म, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सत्यजित तांबे काय म्हणाले? वाचा…
-गेले 20-25 दिवस आपण नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं राजकारण झालं. त्यावर खरंतर, अनेकांनी मला प्रश्न विचारले गेले. त्याबाबतीत भूमिका मांडायची होती. अनेक आरोप आमच्या परिवारावर झाले. आपण ज्या पक्षात आयुष्यभर राहिलो. मी अनेकवेळा सांगितलं की, आमच्या कुटुंबाला 2030 साली काँग्रेसमध्ये शंभर वर्षे पूर्ण होताहेत. किती निष्ठेनं आम्ही या पक्षात काम केलंय, हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला.
-मी 2000 मध्ये काँग्रेस पक्षाच्या युवक विद्यार्थी संघटनेच्या (National Students Union of India) माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. 2000 मध्ये मला एनएसयूआय (National Students Union of India)चं प्रदेश सचिवपद देण्यात आलं. तिथून मी काम केलं. 2007 ते 2017 या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2007 ला तत्कालीन युवक काँग्रेसचे आमचे नेते राजीव सातव यांनी विद्यार्थी चळवळीतून युवक काँग्रेसमध्ये आणलं. 2011 ची युवक काँग्रेसची निवडणूक राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सगळ्या विचारांवर विश्वास ठेवून लढलो. 2014 ची निवडणूक लढलो आणि जिंकलो. 2018 मध्ये मी पुन्हा निवडणूक लढलो आणि युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली.
-2018 ला युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो तेव्हा राज्यात काँग्रेसची स्थिती वाईट होती. आव्हानात्मक परिस्थितीत मी अनेक उपक्रम राबवले. मी संघटन बांधण्याचं काम प्रामाणिकपणे केलं. त्याची दखल पक्षाकडून घेतली गेली. 2022 मध्ये युवक काँग्रेसची माझी कारकीर्द संपली. 2019 मध्ये लोकसभेत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. कार्यकर्त्यांचं मनोबल खचलेलं असताना मी पहिला कार्यकर्ता होतो की ज्याने दादरच्या टिळक भवनला बैठक घेतली होती.