शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उल्लेख केलेले भाजपचे साडेतीन लोक कोण?

मुंबई तक

शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत याचं वातावरणही तयार झालं आहे. नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणाहून शिवसेना भवन या ठिकाणी पोहचत आहेत. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शिवसेना एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच करते आहे. अशात भाजपचे साडेतीन लोक असा उल्लेख संजय राऊत यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत याचं वातावरणही तयार झालं आहे. नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणाहून शिवसेना भवन या ठिकाणी पोहचत आहेत. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शिवसेना एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच करते आहे. अशात भाजपचे साडेतीन लोक असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. पेशवाईत साडेतीन शहाण्यांच्या उल्लेख आहे. भाजप हा पेशव्यांचा पक्ष आहे अशीही टीका त्यांच्यावर होत असते. अशात आता संजय राऊत यांनी साडेतीन लोकांचा उल्लेख केला आहे त्याची चर्चा होते आहे.

पेशवाईतले साडेतीन शहाणे कोण? तर पेशवाईच्या काळातील साडेतीन शहाणे म्हणून सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर हे पूर्ण शहाणे म्हणून ओळखले जातात. हे तिघेही मुत्सद्दी आणि योद्धे होते. तर, उरलेले अर्धे शहाणे म्हणून नाना फडणवीस यांचा उल्लेख करण्यात येतो. कारण नाना फडणवीसांना युद्धकला फारशी अवगत नव्हती. ते मुत्सदी आणि धोरणी होते पण युद्धात पारंगत नव्हते त्यामुळे त्यांचा उल्लेख अर्धे शहाणे असा केला जातो.

‘संजय राऊत इशारा देतात तेव्हा…’ स्फोटक पत्रकार परिषदेबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

हे वाचलं का?

    follow whatsapp