शिवजयंती विशेष: समुद्र, आरमार आणि छत्रपती शिवाजी महाराज!
मुंबई: आपल्या कर्तृत्वाला जर दूरदृष्टीची जोड असेल तर माणूस हिमालयाला देखील टक्कर देऊ शकतो असं नेहमी म्हटलं जातं. पण दूरदृष्टी कशी असावी याचं उत्तम उदाहरण हे आपल्याला इतिहासाची पानं चाळल्यानंतर अवघ्या काही क्षणात सापडू शकतं. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! आरमाराबाबत शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होय… छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजवर जे काही कार्य केलं […]
ADVERTISEMENT

मुंबई: आपल्या कर्तृत्वाला जर दूरदृष्टीची जोड असेल तर माणूस हिमालयाला देखील टक्कर देऊ शकतो असं नेहमी म्हटलं जातं. पण दूरदृष्टी कशी असावी याचं उत्तम उदाहरण हे आपल्याला इतिहासाची पानं चाळल्यानंतर अवघ्या काही क्षणात सापडू शकतं. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!
आरमाराबाबत शिवाजी महाराजांची दूरदृष्टी
होय… छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजवर जे काही कार्य केलं त्यामागे प्रचंड मोठी दूरदृष्टी होती. त्यामुळेच तब्बल ३५० साडेतीनशे वर्षानंतरही त्यांचं कार्य हे अबाधित आहे. शिवाजी महाराजांनी तत्कालीन काळात संरक्षणाच्या दृष्टीने केलेलं कार्य हे किती महत्त्वाचं होतं हे आजच्या परिस्थितीवरुन देखील आपल्याला लक्षात येऊ शकतं. भविष्यात भारत भूमीवर समुद्रमार्गे देखील शत्रूकडून हल्ला होऊ शकतो हे साडेतीन वर्षांपूर्वीच महाराजांनी ताडलं होतं. यामुळेच त्यांनी समुद्रावर आपलं आरमार स्थापन केलं. याच आरमाराची परिणीती आपल्याला आजच्या अत्याधुनिक नौदलामध्ये दिसतं.
‘ज्याचं आरमार, त्याचा समुद्र’