देशाच्या देवाचा अपमान झाला आहे तरी चंपा असो की डंफा सगळे मूग गिळून बसलेत, अरविंद सावंत यांची टीका
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. तसंच भाजपवर कडाडून टीका केली जाते आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. कर्नाटकात घडलेल्या घटनेवरून आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली जाते आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आता यावरून भाजपवर घणाघाती टीका केली आहे. बंगळुरु: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, […]
ADVERTISEMENT

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. तसंच भाजपवर कडाडून टीका केली जाते आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. कर्नाटकात घडलेल्या घटनेवरून आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली जाते आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आता यावरून भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
बंगळुरु: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
काय म्हणाले आहेत अरविंद सावंत?
‘कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार आहे, पण देशाच्या देवाचा अपमान होतो आणि कोणतीही कारवाई होत नाही. चंपा असो की डंफा सगळे मूग गिळून गप्प बसतात. कानडी बांधव महाराष्ट्रातही आहेत. त्यांना इथे त्रास दिला जात नाही. शाळा बंद केल्या जात नाही. तुम्ही आता तुमच्या सरकारला सांगा नाहीतर तुमचं महाराष्ट्रात राहणं कठीण होईल’ असाही इशारा सावंत यांनी दिला आहे. एवढंच नाही तर आम्ही सत्व आणि तत्व सोडलेलं नाही. आम्हाला आमच्या मूळ स्वभावावर यायला लावू नका. छत्रपती शिवाजी महाराज हे धगधगता अग्नी आहेत. त्यांचा अवमान झाल्यानंतर सगळ्यांची बोबडी वळली आहे असाही टोला सावंत यांनी लगावला आहे.