“CM शिंदेंकडे बाळासाहेबांचे तर उद्धवजींकडे पवारांचे विचार” : रामदास कदम यांचा हल्लाबोल

मुंबई तक

खेड : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरु आहेत. अशातच शिवतीर्थावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी केली आहे. रामदास कदम खेडमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बोलत होते. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार हा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

खेड : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरु आहेत. अशातच शिवतीर्थावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी केली आहे. रामदास कदम खेडमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बोलत होते.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार हा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांच्यासोबत आहेत त्यांनाच जनतेने दिलेला आहे. बाळासाहेब यांचे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर उध्दवजींकडे पवारांचे विचार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घ्यावा आणि ताकद दाखवून द्यावी, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

रामदास कदम म्हणाले, आजची जी उद्धव सेना आहे ती शरद पवार यांच्या मांडीवर बसून राष्ट्रवादी पुरस्कृत उद्धव सेना आहे. कालपर्यंत बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला, त्यांच्या मांडीवर बसून तुम्ही पक्ष चालवत आहात. पण तुम्हाला 16 टक्के निधी आणि त्यांना 57 टक्के निधी, मग आमदार तुमच्याकडे थांबतील कसे? शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळणार नसेल, पण तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांना निधी मिळणार असेल, तर मग कुठला आमदार तुमच्याकडे थांबेल? असे सवाल रामदास कदम यांनी यावेळी उपस्थित केले.

महिला, कमिशन, संपत्ती… : आमदार अमोल मिटकरींविरुद्ध गंभीर आरोपांची माळ

हे वाचलं का?

    follow whatsapp