बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस तर पळून गेले होते, दीपाली सय्यद यांचा खोचक टोला

मुंबई तक

बाबरी पाडली त्यावेळी मी तिथे होतो असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेचे बाण सुरू झाले. संजय राऊत यांनी थेट अडवाणींचा व्हीडिओ ट्विट करत त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस हे तर १८५७ चा उठाव झाला त्या लढ्यातही सहभागी झाले होते असा टोला लगावला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बाबरी पाडली त्यावेळी मी तिथे होतो असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेचे बाण सुरू झाले. संजय राऊत यांनी थेट अडवाणींचा व्हीडिओ ट्विट करत त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस हे तर १८५७ चा उठाव झाला त्या लढ्यातही सहभागी झाले होते असा टोला लगावला आहे. त्या पाठोपाठ आता दीपाली सय्यद यांनीही फडणवीसांवर टीका केली आहे.

बाबरी कुणी पाडली? फडणवीस म्हणाले मी होतो, संजय राऊत यांनी थेट दाखवला ‘सामना’

काय म्हणाल्या आहेत दीपाली सय्यद?

“बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा देवेंद्र फडणवीस कुठे होते? ते तर पळून गेले होते. एवढंच काय त्यावेळी अमित शाह आणि मोदीही नव्हते. बाबरी पाडली गेली तेव्हा तिथे हिंदू आणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच होते. हे सगळ्या महाराष्ट्राला आणि जगाला माहित आहे. त्यामुळे फडणवीस काय म्हणतात त्याने काही होणार नाही. ते म्हणाले की मी तिथे होतो तर तसं अजिबात नाही.”

हे वाचलं का?