कोरोना आहे काळजी घ्या म्हणतात अन् मंत्र्यांना यात्रा काढायला सांगतात -अजित पवार
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर नव्याने मंत्री झालेल्या भाजप नेत्यांच्या नेतृत्वात राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच या यात्रा सुरू आहेत. दुसरीकडे केंद्राने राज्य सरकारला काळजी घेण्याचा सल्ला दिला असून, अजित पवारांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी विविध विषयावर संवाद […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर नव्याने मंत्री झालेल्या भाजप नेत्यांच्या नेतृत्वात राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच या यात्रा सुरू आहेत. दुसरीकडे केंद्राने राज्य सरकारला काळजी घेण्याचा सल्ला दिला असून, अजित पवारांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी विविध विषयावर संवाद साधला. यावेळी त्यांनी नारायण राणे व भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली.
‘मला नारायण राणेंबाबत चर्चा करायची नाही, त्यांच त्यांना लखलाभ. आम्हाला सरकार चालवायचं आहे. ते केंद्रात मंत्री आहेत; त्यांनी त्याच काम करावं’, असं म्हणत अजित पवारांनी जास्त बोलणं टाळलं.
‘आपल्याकडे अनेक सण आनंदाने करतात. पण एकीकडं केंद्र सरकार सांगतंय की, कोरोना आहे काळजी घ्या आणि नवीन चार मंत्री झाले, त्यांना सांगतात यात्रा काढा नंतर कोरोना वाढला तर याला कोण जबाबदार? याचा विचार केंद्राने करायला हवा. जिथं राजकारण करायचं आहे, तिकडे सगळे राजकारण करू; पण जिथं जनतेचा प्रश्न आहे, तिथे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम केलं पाहिजे. त्यामुळे सण साजरे करताना काळजी घ्यावी’, असं अजित पवार म्हणाले.