उत्तर प्रदेशात अखिलेश भाजपला टक्कर देतील, संजय राऊतांना विश्वास कायम
उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि उर्वरित चार राज्यांत भाजपला सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमताकडे वाटचाल केली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशसह गोव्यातही उमेदवार उभे केले होते. परंतू या दोन्ही राज्यांत शिवसेनेला अद्याप कोणत्याही प्रकारे यश […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि उर्वरित चार राज्यांत भाजपला सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमताकडे वाटचाल केली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशसह गोव्यातही उमेदवार उभे केले होते. परंतू या दोन्ही राज्यांत शिवसेनेला अद्याप कोणत्याही प्रकारे यश मिळताना दिसत नाहीये.
असं असलं तरीही उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष योगी आदित्यनाथ यांना चांगली टक्कर देईल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
Election Results 2022 Live Updates : पंजाबमध्ये ‘आप’ भांगडा! स्पष्ट बहुमताच्या दिशेनं
“अद्याप मतमोजणी सुरु आहे. पोस्टल मतांच्या कलावर जाऊ नका. दोन वाजेपर्यंत पूर्णपणे चित्र स्पष्ट होईल. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष पुढे आहे. उत्तराखंडमध्येही टक्कर सुरु आहे. गोव्यात अद्याप चित्र स्पष्ट होत नाहीये. उत्तर प्रदेशात भाजप आघाडीवर आहे. परंतू मला असंही वाटतंय की अखिलेश यादव भाजपला टक्कर देतील. पाठीमागून सुरुवात केल्यानंतरही अखिलेश यांनी उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी केली आहे. गोवा आणि पंजाबसाठी आताच अनुमान लावणं ठीक होणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.
Goa Election Result 2022 LIVE Updates: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर
गोव्यात काँग्रेस आणि भाजपला बहुमत मिळणार नाही असा अंदाज एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये आला होता. त्यामुळे गोव्यासह आणखी काही राज्यात खिचडी सरकार बनू शकेल असंही संजय राऊत म्हणाले. गोव्यात शिवसेना आपलं खातं उघडणार का असा प्रश्न विचारला असता, संजय राऊतांनी सावध भूमिका घेतली.
गोव्यात ‘मगो’चे ढवळीकर ठरणार किंगमेकर, सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-भाजपकडून मनधरणीला सुरुवात
“गोवा असो किंवा मणिपूर असो आम्ही तिकडे मेहनत घेतली होती. आमचे खासदार तिकडे जाऊन बसले होते. आदित्य ठाकरेंनीही तिकडे सभा घेतली. कोणताही पक्ष आपल्या राज्याबाहेर जातो तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागतो. आम्ही तो केला आणि करत राहू. आम्ही थांबणार नाही.” मागच्या निवडणुकीत गोव्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतानाही भाजपने आमदारांना विकत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती.
पक्षाने साथ दिली नसल्याची खंत, भाजपला क्लिन स्विपची संधी होती पण… – लक्ष्मीकांत पार्सेकर
यंदा असं काहीही होणार नाही असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. मी कालच पी.चिदंबरम यांच्याशी बोललो आहे. आमची सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महाराष्ट्रातून त्यांना जी काही मदत लागेल ती मिळेल असंही संजय राऊत म्हणाले.