मलिकांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव हटवलं; अमृता फडणवीस म्हणतात…

मुंबई तक

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी (1 नोव्हेबर) थेट माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्याचबरोबर जयदीप राणाने रिव्हर अँथम गाण्याला पैसा पुरवल्याचंही ते म्हणाले होते. त्यांच्या आरोपानंतर राणाचं नाव गाण्यातून हटवण्यात आलं. यासंदर्भात अमृता फडणवीस यांनी भूमिका मांडली. नवाब मलिक यांनी सोमवारी ट्विटरवर काही फोटो शेअर केले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी (1 नोव्हेबर) थेट माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्याचबरोबर जयदीप राणाने रिव्हर अँथम गाण्याला पैसा पुरवल्याचंही ते म्हणाले होते. त्यांच्या आरोपानंतर राणाचं नाव गाण्यातून हटवण्यात आलं. यासंदर्भात अमृता फडणवीस यांनी भूमिका मांडली.

नवाब मलिक यांनी सोमवारी ट्विटरवर काही फोटो शेअर केले होते. यात जयदीप राणाचाही फोटो होता. जयदीप राणाला ड्रग्ज प्रकरणात अटक झालेली असून, त्यावरून मलिकांनी थेट फडणवीसांना ड्रग्ज पेडलरसोबत कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई रिव्हर अँथम गाण्यातून जयदीप राणाचं नाव हटवण्यात आलं.

दरम्यान, नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांना अमृता फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं. यावेळी त्यांना जयदीप राणाचं नाव का हटवण्यात आलं अशी विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘रिव्हर मार्च संस्थेला तो ड्रग्जशी संबंधित आहे याची माहिती नसेल. आता म्हणून त्याचं नाव काढून टाकलं असेल. तीन चार वर्षांनी सेंट्रल एजन्सीने त्याला पकडलं. त्यांना वाटलं हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, तर त्यांनी नाव काढलं यात चुकीचं काय आहे?’, असं उत्तर त्यांनी दिलं.

नवाब मलिक तुम्हाला जनता माफ करणार नाही! अमृता फडणवीस यांचा करारा जवाब

हे वाचलं का?

    follow whatsapp