Anant Chaturdashi : पुढच्या वर्षी लवकर या! लाडक्या बाप्पाला निरोप

मुंबई तक

आज अनंत चतुर्दशी असल्याने मुंबईसह राज्यभरात विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस आहे. दहा दिवस पाहुणा म्हणून आलेले बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.. आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या गजरात निरोप घेतील. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं. गणेश चतुर्थीला बाप्पांचं आगमन होतं आणि अनंत चतुर्दशीला बाप्पा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आज अनंत चतुर्दशी असल्याने मुंबईसह राज्यभरात विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस आहे. दहा दिवस पाहुणा म्हणून आलेले बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.. आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या गजरात निरोप घेतील. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं. गणेश चतुर्थीला बाप्पांचं आगमन होतं आणि अनंत चतुर्दशीला बाप्पा निरोप घेतात.

मिरवणुकीची धामधूम

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हा गजर संपूर्ण राज्यभरात ऐकू येतो आहे. मागचे दहा दिवस गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाले होते. त्याचप्रमाणे सार्वजनिक मंडळांमध्येही बाप्पा विराजमान झाले होते.

मुंबईचा राजा, लालबागचा राजा, पुण्यातले मानाचे पाच गणपती य़ा आणि अशा विविध गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यास मिळतील. दोन वर्षांनी या मिरवणुका निघणार आहेत. कारण मागची दोन वर्ष राज्यावर आणि देशावर कोरोनाचं सावट होतं त्यामुळे गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने आणि निर्बंधांसह साजरा केला गेला होता.

मुंबईतल्या लालबाग, परळ, गिरगाव या भागातली अनेक गणेश मंडळं आहेत. या गणेश मंडळातल्या गणेश मूर्तींना विसर्जन केलं जाईल. लाडक्या गणरायाला आज गणेश भक्त साश्रू नयनांनी निरोप देतील. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर पहिल्यांदाच भव्य मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे या वर्षीचा उत्साह वेगळाच असणार आहे यात काही शंका नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp