अरबाझ मर्चंटच्या वडिलांनी आर्यनला विचारलं, ‘तुला घरचं जेवण आणून देऊ का?’ आर्यन म्हणाला…

मुंबई तक

रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये ही पार्टी करण्यात येणार होती. याची माहिती NCB ला म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच त्यांनी ही कारवाई केली. या सगळ्या कारवाईत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली. यापैकी आर्यन खान, अरभाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये ही पार्टी करण्यात येणार होती. याची माहिती NCB ला म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच त्यांनी ही कारवाई केली. या सगळ्या कारवाईत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली. यापैकी आर्यन खान, अरभाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकरणात आर्यन खानला कोर्टाच्या बाहेर अरबाज मर्चंटचे वडील भेटले. त्यांनी आर्यनला ‘तुला घरचं जेवण आणून देऊ का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर आर्यनने नको थँक्स असं उत्तर अरबाजच्या वडिलांना दिलं. त्यानंतर त्यांनी अरबाजला जेवण दिलं. तो कॉरिडॉरमध्ये बसून खात होता, मात्र शाहरूखच्या मुलाने म्हणजेच आर्यनने घरी तयार केलेलं जेवण नाकारलं आहे.

आर्यन खानला रविवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यन खान NCB च्या मेसमध्येच जेवला. आजही त्याला अरबाज मर्चंटच्या वडिलांनी विचारलं तेव्हा त्याने घरचा डबा नको असं सांगितलं आहे. आर्यनच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली. आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही सात ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp