BJP चा विश्वासघात केला म्हणणारे बच्चू कडू उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गेलेच का होते?
BACCHU KADU Politics: मुंबई: ‘बच्चू भाऊ तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं.’ असं म्हणत नाशिकमधील एका शेतकऱ्याने (Farmer) प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांना चांगलंच खिंडीत गाठलं. अशावेळी नेमकं काय उत्तर द्यावं याबाबत स्वत: बच्चू कडू हेच संभ्रमात दिसून आले. तब्बल अडीच वर्ष ज्या ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Govt) बच्चू कडूंनी राज्यमंत्रिपद उपभोगलं. […]
ADVERTISEMENT

BACCHU KADU Politics: मुंबई: ‘बच्चू भाऊ तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं.’ असं म्हणत नाशिकमधील एका शेतकऱ्याने (Farmer) प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांना चांगलंच खिंडीत गाठलं. अशावेळी नेमकं काय उत्तर द्यावं याबाबत स्वत: बच्चू कडू हेच संभ्रमात दिसून आले. तब्बल अडीच वर्ष ज्या ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Govt) बच्चू कडूंनी राज्यमंत्रिपद उपभोगलं. त्याच सरकारच्या सर्वेसर्वा असलेल्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) निवडणूक निकालानंतर भाजपची (BJP) साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP) सोबत जायला नको होतं असं बच्चू कडू आता का म्हणत आहेत? असे सवाल आता त्यांना विचारले जात आहेत. (bachchu kadu said shiv sena had betrayed bjp yet how did kadu get included in uddhav thackerays cabinet)
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया..
नाशिक जिल्ह्यातील निफाडमधील एका शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी बच्चू कडू हे गेले होते. यावेळी बच्चू कडूंना शेतकऱ्यांने थेट सुनावलं. शेतकरी म्हणाला की, ‘भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. या गद्दारांबरोबर जायला नको होतं. भाऊ, विधानसभेत तुम्हीच शेतकऱ्यांची बाजू मांडून आम्हा द्राक्ष, कांदा उत्पादकांना न्याय द्या.’
शेतकऱ्याने अचानक केलेल्या या विधाननंतर काही क्षण बच्चू कडू हे देखील अवाक् झाले. ते त्यावर म्हणाले की, ‘गद्दार म्हणजे काय.. उद्धव साहेब उभे होते आणि उद्धव साहेब भाजप-शिवसेनेचं पोस्टर लावून निवडून आले. बरोबर आहे? तुम्ही मतदान काय मारलं… नाही.. नाही आपण एकतर्फी नाही निष्पक्ष बोलू.’
‘आता तुम्ही आणि माझी युती आहे.. आपण ग्रामपंचायतला पॅनलला एकत्र आलो.. तुम्ही काय केलं की, मला सरपंच व्हायचंय. तर बच्चू कडूला सोडायचंय आणि तुम्ही लगेच काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडला. त्यावेळी तुम्ही ज्याच्या सोबतीने निवडून आलात त्यांना तुम्ही सोडून दिलं. हे बरोबर आहे की नाही?’