भाजपने ज्योतिषी बदलावा; आशिष शेलारांच्या ‘त्या’ विधानावरून थोरातांचा टोला
राज्यातील सत्तेतील तीनपैकी दोन पक्षांचे संकेत आमच्याकडे येत आहेत, असं सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं भाकित केलं होतं. शेलार यांनी केलेल्या विधानावरून राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलेल्या भाकिताविषयी बोलताना […]
ADVERTISEMENT

राज्यातील सत्तेतील तीनपैकी दोन पक्षांचे संकेत आमच्याकडे येत आहेत, असं सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं भाकित केलं होतं. शेलार यांनी केलेल्या विधानावरून राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलेल्या भाकिताविषयी बोलताना ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपकडून भाकीतं केली जाता आहेत. आता भाजपने ज्योतिषी बदलण्याची गरज आहे’, असा टोला थोरातांनी लगावला.
महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘नितीन गडकरी आणि शरद पवारांची भेट होऊ शकते. नितीन गडकरी यांना आम्ही राजकारणापलिकडे बघतो. राजकारण आणि विकास हे वेगवेगळं ठेवलं पाहिजे’, असं मत त्यांनी मांडलं.
मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही, संघर्ष करणार, नाना पटोलेंचा इशारा