चंद्रकांत पाटील वादाच्या भोवऱ्यात; महापुरुषांवरील वक्तव्यानंतर विरोधकांनी घेरलं

मुंबई तक

मुंबई : भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधान केली जात असल्याचा आरोप होत असतानाच आता मंत्री चंद्रकांत पाटील हे ही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल एका विधाननंतर ते आता टीकेचे धनी झाले आहेत. काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? पैठणमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला संत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधान केली जात असल्याचा आरोप होत असतानाच आता मंत्री चंद्रकांत पाटील हे ही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल एका विधाननंतर ते आता टीकेचे धनी झाले आहेत.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

पैठणमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला संत विद्यापीठ सुरु करायचं असेल तर सरकार नक्की मदत करतील. मी आणि संदीपान भुमरे अशा चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो तर पैशांची कमतरता येणार नाही.

पण माझं म्हणणं आहे की सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कोणी सुरु केल्या? शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. मला शाळा चालवतोय, पैसे द्या. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.

पुढे ते म्हणाले, आता त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे, हेही त्यांनी नमूद केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp