बृजभूषण शरण सिंह का म्हणाले, राज ठाकरे रावणापेक्षाही पापी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येचा दौरा करणार आहेत.मात्र राज ठाकरेंच्या या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आव्हान दिलं आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. ते माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी राज ठाकरेंची तुलना रावणाशी केली आहे. राज […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येचा दौरा करणार आहेत.मात्र राज ठाकरेंच्या या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आव्हान दिलं आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. ते माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी राज ठाकरेंची तुलना रावणाशी केली आहे. राज ठाकरे हे रावणापेक्षाही पापी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत बृजभूषण शरण सिंह?
आपला जो हिंदू धर्म आहे तो हे सांगतो की आपण जर एखाद्या जन्मात काही पाप केलं आहे तर ते दुसऱ्या जन्मातही फेडावं लागतं.त्याशिवाय मुक्ती मिळत नाही अशीही आपल्याकडे धारणा आहे. राज ठाकरेंनी तर २००८ पासून आत्तापर्यंत पापच केलं आहे. अचानक अजान आणि हनुमान चालीसा यांचा मुद्दा त्यांनी पुढे केला आणि आता ते अयोध्येला येत आहेत. राज ठाकरेंचं राजकीय दुकान बंद पडण्याच्या स्थितीत आहे. त्यांचे आमदार किती आहेत? त्यांचं राजकीय महत्त्व आहेच काय? असेही प्रश्न सिंह यांनी विचारले आहेत.