भाजपमधून बाहेर पडल्यानंतर काय त्रास होतो हे दाखवायचं असल्यानेच खडसेंची ईडी चौकशी-भुजबळ

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जमीन घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांची चौकशी केली जाते आहे. याप्रकरणी आता अन्न वा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर काय त्रास होतो हे हे खडसेंना दाखवायचं आहे त्यामुळे ईडी चौकशी केली जाते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जमीन घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांची चौकशी केली जाते आहे. याप्रकरणी आता अन्न वा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर काय त्रास होतो हे हे खडसेंना दाखवायचं आहे त्यामुळे ईडी चौकशी केली जाते आहे, त्यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अन्य पक्षातले लोक भाजपमधे गेले की त्यांचे गुन्हे माफ होतात. जे लोक भाजप सोडून अन्य पक्षांमध्ये जातात त्यांना त्रास दिला जातो. एकनाथ खडसे आणि आम्ही सगळेजण त्यांना निश्चितपणे उत्तर देऊ असाही इशारा छगन भुजबळ यांनी दिला. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेल्या संधीबाबत विचारलं असता कोरोना काळात त्यांना आरोग्य खात्यासारखं खातं मिळालं आहे याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

जयंत पाटील यांची ही टीका

भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. त्यामुळे ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्यात आले.’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp