राज्यपालांच्या विमान प्रवास वादावर CM ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (12 फेब्रुवारी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरुन झालेल्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जव्हारच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांना राज्यपालांच्या विमान प्रवासबाबत विचारण्यात आलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर थेट काही भाष्य करणं टाळलं. मात्र, त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (12 फेब्रुवारी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरुन झालेल्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जव्हारच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांना राज्यपालांच्या विमान प्रवासबाबत विचारण्यात आलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर थेट काही भाष्य करणं टाळलं. मात्र, त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, ‘आता विमानाचा विषय निघालाच आहे तर माझा असा विचार आहे की इथेच (जव्हार) आपण एक छोटी धावपट्टी तयार करु. म्हणजे सगळ्यांचीच विमानं इथे उतरतील.’ अशी मिश्किल टिप्पणी करत मुख्यमंत्र्यांनी या विषयाला बगल दिली.

दरम्यान, राज्यपालांच्या विमानाप्रवासाबाबत आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मात्र ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘राज्यपालांना विमानातून उतरवणे हा पोरखेळ आहे. खरं तर हा घटनात्मक पदाचा अपमान आहे. मुख्यमंत्री ठाकरेंकडे विमान प्रवासाच्या परवानगीची फाइल गेली होती पण ती मुद्दाम बाजूला ठेवण्यात आली.’ असं म्हणत दरेकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

राज्यपालांच्या विमान प्रवासाचा नेमका वाद काय?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना काल (11 फेब्रुवारी) सकाळी देहरादून येथील लाल बहादूर अॅकेडमी येथील कार्यक्रमासाठी जायचं होतं. त्यासाठी ते शासकीय विमानात देखील बसले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना सांगण्यात आलं की, या विमानाला उड्डाणासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यपालांना त्या विमानातून पुन्हा खाली उतरावं लागलं. त्यानंतर राज्यपालांना ऐनवेळी तिकीट काढून व्यावसायिक विमानातून प्रवास करावा लागला.

हे वाचलं का?

    follow whatsapp