शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या नावाचा सोनिया गाधींकडून खास उल्लेख; म्हणाल्या…
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या विविध मुद्यांसंदर्भातील भूमिकेवर टिप्पणी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दलही भाष्य केलं. सोनिया गांधी यांची विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत […]
ADVERTISEMENT

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या विविध मुद्यांसंदर्भातील भूमिकेवर टिप्पणी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दलही भाष्य केलं.
सोनिया गांधी यांची विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरण धोरणापासून ते मोफत धान्य वाटपाच्या केंद्राच्या धोरणावर भूमिका मांडली. सोनिया गांधी म्हणाल्या,’विरोधकांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर केंद्रानं लस खरेदी धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले. जोपर्यंत देशातील गरिबांना लाभ होत आहे, तोपर्यंत त्यांचं श्रेय कोण घेतंय हे महत्त्वाचं नाही’, सोनिया गांधी यांनी यावेळी नमूद केलं.
Sharad Pawar ji brought to attention how Ministry of Cooperation, led by HM, is interference in Constitutional rights-responsibilities of state govts. Mamata ji & Uddhav ji emphasized discrimination against non-BJP ruled states in vaccine supply, as have other CMs: Sonia Gandhi pic.twitter.com/rXPQu35sIT
— ANI (@ANI) August 20, 2021
‘केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सूत्रं असलेलं केंद्रीय सहकार मंत्रालय कशा पद्धतीने राज्य सरकारच्या घटनात्मक अधिकार आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचं शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिल्याचं मला समजलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनीही बिगर भाजप शासित राज्यांसोबत केंद्र सरकारकडून लस पुरवठ्यात होत असलेल्या भेदभावांकडे लक्ष वेधलं’, असं म्हणत सोनिया गांधी दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं.
‘कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. लसीकरण धोरण, तीन कृषी कायदे रद्द करणे आणि अन्नधान्याचं मोफत वितरण करण्याबद्दल १२ मे रोजी पंतप्रधानांना पत्र दिलं होतं. त्यानंतर केंद्रानं लस खरेदी धोरणात बदल केला’, असं सोनिया गांधी म्हणाल्या.










