सीताराम केसरींना खोलीत बंद करुन सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षा झाल्या होत्या?
नवी दिल्ली: काँग्रेसने अनेक टीकांचा सामना केल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पदासाठी कोणीही दावा करु शकतो असे सांगण्यात आले आहे. मागच्या कित्येक वर्ष काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नाहीये, त्यामुळे भाजप काँग्रेसवरती वारंवार टीका करत आहे. यापूर्वी 2001 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती, ज्यामध्ये सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: काँग्रेसने अनेक टीकांचा सामना केल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पदासाठी कोणीही दावा करु शकतो असे सांगण्यात आले आहे. मागच्या कित्येक वर्ष काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नाहीये, त्यामुळे भाजप काँग्रेसवरती वारंवार टीका करत आहे.
यापूर्वी 2001 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती, ज्यामध्ये सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या आणि जितेंद्र प्रसाद यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. म्हणजेच 21 वर्षांपूर्वी अशाच एका निवडणुकीत दोन उमेदवार आमने-सामने आले होते. 2017 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही झाली होती, मात्र त्यात राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली होती.
काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक होणार की निवड?
138 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय इतिहासात काँग्रेसने अनेक संकटांचा सामना केला आहे, परंतु अस्तित्वाच्या संकटाचा सामना करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अशा वेळी योग्य अध्यक्ष निवडण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. मात्र, ही निवडणूक होणार की निवड हा मोठा प्रश्न आहे. बरं, मागील निवडणूक आणि त्यापूर्वीच्या घडामोडींवर एक नजर टाकूया.
नरसिंह राव यांची निवड कशी झाली?
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठीची चढाओढ नवीन नाही. 1991 मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांची हत्या झाली आणि पीव्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले. तेव्हा पक्षातील वर्चस्वाची लढाई समोर आली. पुढच्याच वर्षी राव यांना काँग्रेसचे अध्यक्षही करण्यात आले.