PMLA Court: संजय राऊत प्रकरणात ईडीने भीतीचं वातावरण कसं निर्माण केलं? शरद पवारांचं नाव घेत न्यायालयाने काय म्हटलं?
संजय राऊत प्रकरणात स्वप्ना पाटकर यांना आरोपी का केलं गेलं नाही? असा प्रश्न विचारत PMLA न्यायालयाने ईडी या तपासयंत्रणेनं भीतीचं वातावरण निर्माण केलं ही बाब नमूद केली आहे. PMLA अर्थात प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग अॅक्ट विशेष न्यायालयाने म्हटलं आहे ईडीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या मनात भीती […]
ADVERTISEMENT

संजय राऊत प्रकरणात स्वप्ना पाटकर यांना आरोपी का केलं गेलं नाही? असा प्रश्न विचारत PMLA न्यायालयाने ईडी या तपासयंत्रणेनं भीतीचं वातावरण निर्माण केलं ही बाब नमूद केली आहे. PMLA अर्थात प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग अॅक्ट विशेष न्यायालयाने म्हटलं आहे ईडीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
ईडीने भीती कशी निर्माण केली गेली?
ईडी या तपास यंत्रणेने अनेक अधिकाऱ्यांना अटक करणं किंवा आरोपी बनवणं, संभाव्य आरोपींना साक्षीदार बनवणं यातून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना त्यांना असा संदेश द्यायचा होता की आता यापुढे तुमचा नंबर लागू शकतो.
ईडीच्या आरोप पत्रात शरद पवारांचं नाव
पत्रा चाळ प्रकरणात ईडीने दाखल केलेलं जे आरोपपत्र आहे त्यात २००६-०७ या वर्षात संजय राऊत यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या बैठकीत भाग घेतल्याचा उल्लेख आहे. तसंच त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या काळात देशाचे कृषी मंत्री असलेले शरद पवार यांचंही नाव यात आहे. भाजपने हाच मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चौकशीचीही मागणी केली होती.
स्वप्ना पाटकर यांच्याबाबत काय म्हटलं आहे कोर्टाने?
संजय राऊत यांच्या विरोधातल्या खटल्यात त्यांच्या माजी सहकारी स्वप्ना पाटकर मुख्य साक्षीदार होत्या. संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यात भांडण आणि वाद झाल्यानंतर त्या साक्षीदार झाल्या होत्या. खासदाराने प्रोसीड ऑफ क्राईम अर्थात पीओसी रोख रक्कम कशी दिली ते स्वप्ना पाटकर यांनी सांगितलं होतं. कोर्टाने याबाबत प्रश्न विचारला की ईडीने स्वप्ना पाटकर यांना आरोपी का केलं नाही? त्यांना अटकही का झाली नाही? तक्रारीत हे स्पष्ट होतं आहे की त्यांनी सदरचा व्यवहार केला होता.










