काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे संकेत! सोनिया गांधींनी ५ जणांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

मुंबई तक

१० मार्च रोजी लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत. जी २३ नेत्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या धोरणांबद्दल पुन्हा एकदा टीकेचा सूर लावला आहे. अशातच उत्तर प्रदेशसह पाच राज्यात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाच नेत्यांवर यासंदर्भातील जबाबादारी सोपवली आहे. देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचही राज्यात काँग्रेसला पराभवाला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

१० मार्च रोजी लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत. जी २३ नेत्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या धोरणांबद्दल पुन्हा एकदा टीकेचा सूर लावला आहे. अशातच उत्तर प्रदेशसह पाच राज्यात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाच नेत्यांवर यासंदर्भातील जबाबादारी सोपवली आहे.

देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचही राज्यात काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला, तर पंजाबमध्ये सत्ता गमवावी लागली. महत्त्वाचं म्हणजे अवघ्या २० च्या आतच जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. मणिपूर, उत्तराखंडमध्येही काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली नाही.

काँग्रेसला सातत्याने निवडणुकीत अपयश येत असल्यानं या निकालानंतर काँग्रेसमधील एक गट आता थेट काँग्रेस नेतृत्वाशी भिडताना दिसत आहे. दरम्यान, पाच राज्यात झालेल्या पराभवानंतर सोनिया गांधी यांनी संघटनात्मक बदलांचे संकेत दिले आहेत.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या निवडणुका पार पडलेल्या राज्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन संघटनात्मक बदलांसंदर्भात सूचना करण्यासाठी पाच नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. यात महाराष्ट्रातील एका महिला नेत्याचा समावेश आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp