औरंगाबाद : दहावी–बारावी वगळता इतर सर्व वर्ग २० मार्चपर्यंत बंद

मुंबई तक

जिल्ह्यात वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता, विद्यार्थ्यांमध्ये याचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १० वी आणि १२ वी चे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग २० मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत. अवश्य वाचा – महाराष्ट्रात ८ हजार ८९८ नवे Corona रूग्ण, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जिल्ह्यात वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता, विद्यार्थ्यांमध्ये याचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १० वी आणि १२ वी चे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग २० मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत.

अवश्य वाचा – महाराष्ट्रात ८ हजार ८९८ नवे Corona रूग्ण, ६० मृत्यूंची नोंद

महानगरपालिका क्षेत्र वगळून ग्रामीण भागासाठी हे नियम असणार आहेत. पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून…दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रत्येक दिवशी थर्मल गन आणि ऑक्सीमीटरद्वारे तपासणी करुन नोंद ठेवण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याचसोबत शिक्षकांनाही दर आठवड्याला RTPCR चाचणी करुन घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षक किंवा इतर कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळला तर ४ दिवस शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात येईल. यानंतर सर्व शिक्षकांच्या RTPCR चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत शाळा-कॉलेज सुरु करु नये असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अवश्य वाचा – अकोल्यातील कठोर लॉकडाऊनच्या नियमात ‘हे’ बदल

हे वाचलं का?

    follow whatsapp