Train Accident: एक्सप्रेसचे तब्बल 12 डब्बे घसरले, 4 प्रवाशांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bikaner express derailed: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस (15633) रुळावरून घसरुन भीषण अपघात झाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सुमारे 20 जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात ट्रेनचे तब्बल 12 डबे रुळावरून घसरले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन बिकानेरहून गुवाहाटीला जात होती. दरम्यान, मैंगुडी येथे हा अपघात झाला. माहिती मिळताच, रेल्वे पोलीस प्रशासनासह जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना रेल्वेच्या बोगीतून बाहेर काढल्यानंतर नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी 5.15 च्या सुमारास घडली. बिकानेर एक्सप्रेस ट्रेनचे 12 बोगी रुळावरून घसरले असून प्रवाशांनी भरलेले 4 डबे पूर्णपणे उलटले आहेत. यातील एक डबा तर थेट नजीकच्या पाण्यात गेला होता. आता त्यात अडकलेल्या प्रवाशांची सध्या सुटका करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नजीक कोणतेही स्थानक नव्हते आणि ट्रेन मोकळ्या भागातून जात असतानाच तिथे अपघात झाला. त्यामुळेच बचाव पथकाला तातडीने मदतीला येण्यास वेळ लागला. मात्र, आता एनडीआरएफसह स्थानिक बचाव पथक घटनास्थळी पोहचलं आहे.

ADVERTISEMENT

जखमी प्रवाशांवर उपचार करण्यासाठी तब्बल 51 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून जलपाईगुडीहून एक रिलीफ ट्रेन पाठवण्यात आली आहे. तसेच उत्तर बंगालमधील वैद्यकीय महाविद्यालयांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर रुग्णालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

रेल्वे अपघातात सुमारे 20 जण जखमी झाल्याची माहिती जलपाईगुडीच्या डीएमने दिली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. सीपीआरओ रेल्वे कॅप्टन शशिकिरण यांनी सांगितले की, राजस्थानमधील बिकानेर येथून 308 प्रवासी निघाले होते.

हेल्पलाइन क्रमांक जारी

CPRO रेल्वे कॅप्टन शशिकिरण यांनी सांगितले की, राजस्थानमधील बिकानेर येथून 308 प्रवासी निघाले होते. या अपघाताच्या वृत्तानंतर त्या प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी 0151-2208222 हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे, तर जयपूरच्या लोकांसाठी हेल्पलाइन क्रमांक- 0141- 2725942 रेल्वेने जारी केला आहे. या क्रमांकांवर कॉल करून संपूर्ण स्थिती जाणून घेता येईल.

मोठी दुर्घटना टळली! लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ ‘इंदोर-दौंड एक्सप्रेस’ घसरली

रेल्वे अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही चर्चा केली आहे. कोव्हिड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आयोजित बैठकीत सीएम ममता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींशी जोडल्या गेल्या होत्या. त्याचवेळी या अपघाताबाबतही त्यांनी चर्चा केली आणि परिस्थिती जाणून घेतली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT