समीर वानखेडेंना झटका! न्यायालय म्हणाले ‘आभाळ कोसळणार आहे का?’
भारतीय रेव्हेन्यू सेवेत कार्यरत असलेले आणि एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे बार परवान्यामुळे अडचणीत आले आहेत. फसवणुकीसह वानखेडेंविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र याचिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. यावेळी न्यायालयानंही खडेबोलही सुनावले. समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सद्गुरु रेस्तराँ […]
ADVERTISEMENT

भारतीय रेव्हेन्यू सेवेत कार्यरत असलेले आणि एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे बार परवान्यामुळे अडचणीत आले आहेत. फसवणुकीसह वानखेडेंविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र याचिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. यावेळी न्यायालयानंही खडेबोलही सुनावले.
समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सद्गुरु रेस्तराँ आणि बारचा परवाना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. फसवणूक आणि खोटी माहिती देऊन परवाना घेण्यात आल्याचा आरोप वानखेंडेवर आहे. याप्रकरणात वानखेडेंविरुद्ध ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात झाला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे यांनी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, तसेच बार परवाना पुन्हा सुरू (पूर्ववत) करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका आज सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायालयाने संताप व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि माधव जमादार यांनी याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं सांगत सुनावणीस नकार दिला. तसेच याचिकेची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं.










