राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी घेतली अमित शाहांची भेट, 12 आमदारांच्या नियुक्तींवरुन चर्चा?

मुंबई तक

नवी दिल्ली: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी (दि.13) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली आहे. मात्र या भेटीमुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत आठ महिने उलटून गेल्यानंतर देखील राज्यपाल कोश्यारी यांनी निर्णय न घेतल्याने याप्रकरणी हायकोर्टने आपली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी (दि.13) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली आहे. मात्र या भेटीमुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत आठ महिने उलटून गेल्यानंतर देखील राज्यपाल कोश्यारी यांनी निर्णय न घेतल्याने याप्रकरणी हायकोर्टने आपली नाराजी स्पष्ट केली. त्याचवेळी कोश्यारी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीला अनेक अर्थ प्राप्त झाले आहेत.

राज्यपाल आणि अमित शाह यांची सदिच्छा भेट असल्याचं जरी सांगितलं गेलं तरी देखील यावेळी 12 आमदारांच्या (12 MLA) नियुक्तींबाबत नक्कीच चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने 12 नामनिर्देशित आमदारांची यादी पाठवून आता आठ महिने होऊन गेलेले आहेत.

मात्र, अद्याप तरी राज्यापालांनी त्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. अशावेळी याचप्रकरणी कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यावर सुनावणी दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की, 12 आमदारांच्या जागा या अनिश्चित काळासाठी रिक्त ठेवता येणार नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp