भाजप सरकारच्या काळात मलाही त्रास झाला – शिवसेना मंत्री शंकरराव गडाख

मुंबई तक

गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहील्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आपल्याला होणारा त्रास. पक्षाकडून न मिळणारं सहकार्य असे अनेक मुद्दे मांडत सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करण्याचा सल्ला दिला. यानंतर शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने भाजप सरकारच्या काळात आपल्यालाही अशाच पद्धतीने त्रास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहील्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आपल्याला होणारा त्रास. पक्षाकडून न मिळणारं सहकार्य असे अनेक मुद्दे मांडत सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करण्याचा सल्ला दिला. यानंतर शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने भाजप सरकारच्या काळात आपल्यालाही अशाच पद्धतीने त्रास झाल्याचं म्हटलंय.

गेल्या ५ वर्षांमध्ये मी आमदार नसताना सत्तेचा गैरवापर करुन मला अशाच पद्धतीने त्रास देण्यात आला. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला. २०१९ च्या विनाधनसभा निवडणूकीत नेवासा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले गडाख नंतर शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत.

किरीट सोमय्या केंद्रीय यंत्रणांचे दलाल, नाव न घेता प्रताप सरनाईकांचा आरोप

हे वाचलं का?

    follow whatsapp