Aditya Thackeray : “उद्या बंडखोर रस्त्यावर दिसले तर इतकंच विचारा गद्दारी का केली?”

मुंबई तक

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद उद्या बंडखोर रस्त्यावर दिसले तर विचारा की गद्दारी का केली? उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर का खुपसला? एवढंच विनम्रपणे विचारा. असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलं आहे. औरंगाबादमध्ये शिव संवाद यात्रा होती त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं-आदित्य ठाकरे राजकारणात चांगल्या नसताना स्थान नसतं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्या बंडखोर रस्त्यावर दिसले तर विचारा की गद्दारी का केली? उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर का खुपसला? एवढंच विनम्रपणे विचारा. असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलं आहे. औरंगाबादमध्ये शिव संवाद यात्रा होती त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं-आदित्य ठाकरे

राजकारणात चांगल्या नसताना स्थान नसतं हे मी ऐकलं होतं. त्याचा प्रत्यय या गद्दारांमुळे आला. कारण त्या गद्दारीमुळेच या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला खुर्चीवरून पायउतार व्हायला लावलं. उद्धव ठाकरे यांच्याबाबत कुणालाही विचारा सगळे जणं हेच सांगतील की चांगला माणूस आणि काम करणारा मुख्यमंत्री. त्यामुळे आता चांगल्या माणसाला राजकारणात स्थान निर्माण करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे ते आपण मिळवून देऊ यात माझ्या मनात शंका नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मागच्या दोन-अडीच वर्षात जे जे सर्वे झाले त्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आलं होतं. आम्ही जे लोक गेले त्यांच्या मनात काय होतं कळलं नाही. आम्ही सगळ्यांना आपलं समजत होतो मात्र त्यांनीच माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हे वाचलं का?