धक्कादायक! कोल्हापुरात संतापलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणचं कार्यालयच पेटवलं
शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा सलग बारा तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचं शस्त्र उपसलंय. संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर ताराबाई पार्क इथल्या वीज महावितरण कार्यालयासमोर गेली दोन दिवस राजू शेट्टी यांचे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतक-यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल महावितरणच्या कार्यकारी […]
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा सलग बारा तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचं शस्त्र उपसलंय. संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर ताराबाई पार्क इथल्या वीज महावितरण कार्यालयासमोर गेली दोन दिवस राजू शेट्टी यांचे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतक-यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले.
या कार्यालयातील पंधराहून अधिक कम्प्युटर प्रिंटर टेबल व महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाला आहे. कागलच्या शाहू साखर कारखान्याच्या व कागल नगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून ही आग आटोक्यात आणण्याचा महावितरणचा प्रयत्न केला.त्यामुळे आज दिवसभरात राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांन कडुन आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.