लसीकरणाचा उच्चांक! भारताने लसीकरणात ओलांडला 100 कोटी डोसचा टप्पा

मुंबई तक

कोरोनाच्या विषाणूनं थैमान घातल्यानंतर भारतासह जगाच्या नजरा संजीवनी ठरणाऱ्या कोरोना लसीकडे लागल्या होत्या. अथक परिश्रमानंतर लस शोधण्यात यश आलं आणि लसीकरणाचा श्रीगणेशा झाला… बघता बघता आज देशाने लसीकरणात मैलाचा टप्पा पार केला. भारताने १०० कोटी डोस देण्याचा उच्चांकाची आज नोंद केली. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाबद्दल भीती कमी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाच्या विषाणूनं थैमान घातल्यानंतर भारतासह जगाच्या नजरा संजीवनी ठरणाऱ्या कोरोना लसीकडे लागल्या होत्या. अथक परिश्रमानंतर लस शोधण्यात यश आलं आणि लसीकरणाचा श्रीगणेशा झाला… बघता बघता आज देशाने लसीकरणात मैलाचा टप्पा पार केला. भारताने १०० कोटी डोस देण्याचा उच्चांकाची आज नोंद केली.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाबद्दल भीती कमी होऊन नागरिकांचा लस घेण्याकडे कल वाढला. देशात १६ जानेवारी २०२१ रोजी पहिला डोस दिला गेला. अपुरं उत्पादनामुळे देशातील लसीकरणाची सुरुवात संथगतीने झाली होती. मात्र, नंतर लसीकरणाने गती घेतली.

सुरुवातीच्या टप्प्यात देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर १ मार्चपासून देशात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्ती आणि सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती.

१ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाली. त्यानंतर १ मे २०२१ पासून देशातील १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या देशात ६३,४६७ केंद्रावर लसीकरण केलं जात असून, यात ६१,२७० केंद्र सरकारी आहेत, तर २,१९७ केंद्र खासगी आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp